kisan karj mafi राज्यातील एक मुदतीमध्ये अल्पमुदत पीक कर्जाचे परतफेड करणाऱ्या अर्थात नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट 9 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यात राबवल्या जाणाऱ्या बिनव्याजी कर्ज योजने करता 108 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
kisan karj mafi
राज्यातील शेतकऱ्यांना सहकार्य कृषी पतसंस्थामार्फत व्याजदरामध्ये वसुलीशी निगडित प्रोत्साहन पर सवलत देण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबवली जात आहे. सरकार ने एक यादी आराखडा प्रकाशित केला आहे तो खालील लिंकवर देण्यात आला पाहण्यासाठी त्यावर क्लिक कर.
3 लाखापर्यंतच्या कर्जाचे व्याज होणार माफ
- पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी जर पीक कर्ज विहित मुदतीमध्ये परतफेड केल्यानंतर या शेतकऱ्यांचे व्याज माफ करण्यासाठीचा निर्णय घेण्यात आला आहे.
- ज्यामध्ये राज्य शासनाच्या नवीन शासन निर्णय नुसार 2021 पासून राज्य शासनाच्या माध्यमातून 3% आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून 4% असे 7% व्याज हे 3 लाख रुपये मर्यादेपर्यंत माफ केले जाते.
- अर्थात राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज 0% दराने दिली जातात.
महिला विकास योजना, 90% अनुदानावर शिलाई मशीन, पिठाची गिरणीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू
योजनेसाठी 108 कोटीचा निधी मंजूर
- बिनव्याजी कर्ज योजना राज्यांमध्ये राबवली जाते आणि या योजनेसाठी शासन निर्णयाच्या माध्यमातून 108 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- 2023-24 या वर्षाकरिता पंजाबराव देशमुख व्यास सवलत योजना अंतर्गत 360 कोटी रुपयांचे तरतूद करण्यात आली होती.
- नियोजन आणि वित्त विभागाच्या मान्यतेने 108 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे.
- अश्या शेतकऱ्यांची 30 जून पर्यंत संपूर्ण पीक कर्जाची परतफेड केली जाईल.
- अशा अल्पमुदत पीक कर्ज धारक शेतकऱ्यांचे पूर्णपणे व्याज माफ केले जाते
👉शासन निर्णय पाहण्यासाठी क्लिक करा👈
बँक लाभ देत नसेल तर येथे करा तक्रार kisan karj mafi
- बऱ्याच बँकांच्या माध्यमातून हे व्याज घेतले जाते आणि शासनाच्या माध्यमातून व्याज दिल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये व्याज क्रेडिट केल्या जाते.
- तर बहुतांश बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्याकडून कर्ज परतफेड करताना व्याजाची रक्कम माफ करून हे कर्ज भरून घेतल्या जाते आणि अशा प्रकारे या बिनव्याजी कर्ज योजनेचा लाभ दिला जातो.
- परंतु बहुतांश शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम मिळाली नाही किंवा व्याज घेतले अशा प्रकारच्या तक्रारी असतात.
- अशा प्रकारे जर नियमित कर्जदार शेतकरी असाल आणि व्याजाची रक्कम घेतली असेल किंवा योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जात नसेल तर उपनिबंधक कार्यालयामध्ये या संदर्भात तक्रार देऊ शकता.