Bhu Kharedi Yojana ज्यांच्याकडे स्वतःची शेतजमीन नाही अशा शेतकऱ्यांना आता स्वतःची शेतजमीन खरेदी खरेदी करता येणार आहे. त्यासाठी स्टेट बँकेने भू खरेदी योजना आणलेली आहे.
शेती खरेदी योजना काय आहे
- तुमच्याकडे शेतजमीन नाही पण तुम्हाला शेतात नवनवीन प्रयोग करायला आवडतं शेती करायला आवडते.
- स्टेट बँकेने भू खरेदी योजना जर शेती करायची असेल आणि तुमच्याकडे शेतजमीन नसेल एसबीआयच्या या योजनेच्या लाभ घेऊन जमीन खरेदी करू शकता.
- भारतीय स्टेट बँक आता शेतजमीन खरेदी करण्यास कर्ज देत आहे.
- योजनेच्या लाभ घेऊन शेतजमीन खरेदी करू शकता.
कर्ज मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करा.
काय आहे स्टेट बँकेची भू खरेदी योजना
- छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना शेतजमीन खरेदी करण्यासाठी मदत करणे हा एसबीआयच्या उद्देश आहे.
- जे शेतकरी सध्या शेती करताय पण भूमीहिन आहेत असे शेती करणारे भूमीहिन लोक सुद्धा शेतजमीन खरेदी करण्यासाठी या योजनेच्या लाभ घेऊ शकतात.
Bhu Kharedi Yojana पात्रता
- पाच एकर पेक्षा कमी असिंचित म्हणजे जिरायक जमीन आहे.
- तसेच अडीच एकर पर्यंत सिंचित म्हणजेच बागायत जमीन असणारे या भू खरेदी योजनेच्या लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करू शकतात.
- इतरांच्या शेतात काम करणारे भूमीन लोक सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीची कमीत कमी दोन वर्षाची कर्जफेडीची नोंद असणं आवश्यक आहे.
- एसबीआय दुसरे बँकेतील ग्राहकांच्या अर्जावर देखील विचार करू शकते.
- इतर कोणत्याही बँकांचे कर्ज असू नये ही अट आहे.
किती मिळेल कर्ज
- Bhu Kharedi Yojana या योजनेद्वारे अर्ज सादर केल्यानंतर खरेदी केल्या जाणाऱ्या जमिनीचे मूल्यांकन बँक करणार आहे.
- त्यानंतर बँक जमिनीच्या एकूण किमती पैकी 85% कर्ज देऊ शकते.
- या स्कीमद्वारे कर्ज घेऊन खरेदी करण्यात आलेली जमीन बँकेकडे राहणार गहाण अर्जदाराने कर्जाची रक्कम फेडल्यानंतर जमीन त्याच्या ताब्यात दिली जाईल.
- म्हणजेच जोपर्यंत तुम्ही सगळे कर्ज फेडत नाही तोपर्यंत जमीन बँकेच्या ताब्यात राहील.
योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.
Bhu Kharedi Yojana कर्ज फेडण्याचा कालावधी
- या योजनेद्वारे कर्ज घेतल्यानंतर शेतीची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला एक ते दोन वर्ष मिळतात.
- हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दर सहा महिन्यांनी कर्जाचे हप्ते फेडावे लागेल.
- नऊ ते दहा वर्षात तुम्ही संपूर्ण कर्ज फेडू शकत.
- खरेदी केलेली जमीन शेतीसाठी तयार असेल तर कर्जाचे हप्ते पेडण्यासाठी एक वर्षाच्या कालावधी मिळतो.
- पण जमीन शेतीसाठी तयार नसेल तर कर्जाचे रीपेमेंट सुरू करण्यासाठी तुम्हाला दोन वर्षाच्या वेळ दिला जातो.
- म्हणजेच जर तुम्ही घेतलेल्या जमिनीत तुम्हाला लगेच शेती करता येत नसेल तर कर्जफेडीचे हप्ते दोन वर्षानंतर सुरू करता येतात.
Maharashtra Traffic Police :घर बसल्या भरा चलान
Land Record Update :जुन्यातले जुने सातबारा डाउनलोड करा