Krushisahayak

Schemes for farmers in india राज्यातील ४३ तालुक्यांमध्ये दुष्काळ ‘ट्रिगर- टू’ लागू; हेक्टरी साडे आठ ते साडे बावीस हजारांपर्यंत मिळणार मदत.

Schemes for farmers in india

पावसाळा सुरू असतानाही सरासरीच्या ४० टक्केसुद्धा पाऊस झाला नाही आणि त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले, अशा राज्यातील ४३ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ‘ट्रिगर-टू’ लागू करण्यात आला आहे. त्यात सोलापूर व जालना जिल्ह्यातील प्रत्येकी पाच तर पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक सात तालुक्यांचा समावेश आहे.

Krushisahayak

पहा तुमच्या तालुक्यात ट्रीगर टू लागू करण्यात आला का?

सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस

पावसाळ्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस, पावसाचा खूप दिवसांचा खंड, जमिनीतीलपाणीपातळीत घट पिकपेरा व अपेक्षितउत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट, संपूर्णपिके वाया जाणे, जनावरांच्या चान्याचा प्रश्नगंभीर पिण्याच्या पाण्याची टंचाई व पाणी पुरवठा होणान्या स्रोताची सद्य:स्थिती अशा सर्वबाबींचा विचार करून काही तालुक्यामध्ये दुष्काळासंदर्भातील ‘ट्रिगर-टू’ लागू करण्यात आला आहे. Schemes for farmers in india दरम्यान, खरीप २०२३ हंगामात दुष्काळाचे मूल्यांकन ‘महा-मदत’ प्रणालीद्वारे करण्यात आले आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांसह राज्यातील ४३ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर एक व दोन लागू करण्यात आला आहे.

Schemes for farmers in india

किसान क्रेडिट कार्ड वाटप मोहीम सुरू

ट्रिगर-टू लागू

ट्रिगर-टू लागू झालेल्या तालुक्यांमधील क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी महाराष्ट्रराज्य सुदूर संवेदन उपाययोजन केंद्र, नागपूरयांच्या वतीने तयार केलेल्या ‘महा-मदत’ अँपचावापर करावा लागणार आहे. त्यानुसार दुष्काळकशा स्वरूपाचा आहे, याचा अहवाल तयारहोईल. त्यानंतर दुष्काळाची अंतिम कार्यवाहीहोऊन बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीरहोईल, ही प्रक्रिया आता सुरू होणार असून,त्याचा अहवाल ऑक्टोबरअखेरीस शासनालासादर होईल आणि त्यानंतर राज्य सरकारकडूनमदत जाहीर केली जाणार आहे.Schemes for farmers in india

सरकारकडून मिळणारी मदत (रुपयांत)

८,५०० जिरायत, १७,००० बागायती, २२,५०० बहुवार्षिक

Krushisahayak

शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा कर्जमाफी नवीन जीआर आला

या ४३ तालुक्यांतील स्थिती चिंताजनक

उल्हासनगर (जि. ठाणे). शिंदखेडा (जि. धुळे), नंदुरबार (जि.नंदुरबार), मालेगाव, सिन्नर, येवला (जि. नाशिक), बारामती, दौंड,इंदापूर, मुळशी, पुरंदर, शिरूर व वेल्हे (जि. पुणे), बार्शी, करमाळा, माढा,माळशिरस व सांगोला (जि. सोलापूर), अंबड, बदनापूर, भोकरदन,जालना व मंठा (जि. जालना), कडेगाव, खानापूर, मिरज, शिराळा (जि.सांगली), खंडाळा व वाई (जि. सातारा), हातकणंगले व गडहिंग्लज(जि. कोल्हापूर), औरंगाबाद व सोयगाव (जि. छत्रपती संभाजीनगर),अंबाजोगाई, थारूर व वडवणी (जि. बीड), रेणापूर (जि. लातूर). लोहारा,धाराशिव व वाशी (जि. धाराशिव), बुलडाणा व लोणार (जि. बुलडाणा)

रब्बीत गव्हाला ४५ हजार, हरभऱ्याला ३६ हजार रुपये पीक कर्ज मिळणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d